पारदर्शकता : ग्रामपंचायतीच्या सर्व कामांमध्ये पारदर्शकता आणून "डिजिटल ग्रामपंचायत" सारख्या उपक्रमातून लोकाभिमुख करणे.
लोकसहभाग : ग्रामसभेच्या माध्यमातून सार्वजनिक निर्णय आणि प्रक्रियेमध्ये जनतेचा सक्रिय सहभाग घेणे ज्यामध्ये लोकांचे विचार, गरजा आणि मूल्ये इ. अधीन राहून गावाचा विकास करणे.
जबाबदारी : ग्रामपंचायतीच्या निर्णय,कृती,कार्य इ. ची योग्य प्रकारे अंमलबजावणी करून गावाचा विकासला गती देणे.
समानता : नागरिकांना समान संधी न्यायिक अधिकार देणे तसेच वंश, धर्म, लिंग किंवा इतर कोणत्याही कारणास्तव त्यांच्यात कोणताही भेदभाव न करणे.
स्वच्छता व पर्यावरण संवर्धन : नैसर्गिक संसाधने यांचा योग्य उपयोग व पर्यावरणाचे संतुलन कायम ठेवून स्वच्छ व हरित ग्राम निर्माण करून पर्यावरणाचे जतन करणे.
प्रामाणिकपणा : प्रत्येक कार्यात प्रामाणिकपणा, नीतीमत्ता आणि सार्वजनिक कार्यात हिताची भावना जपणे.
नवीन उपक्रम व नावीन्य : आरोग्य, शिक्षण, शेती, स्वच्छता आणि इतर सामाजिक-आर्थिक बाबींचा विचार करून उपलब्ध असलेल्या संसाधनांचा वापर करून गावाचा विकासाला गती मान करणे.
सेवाभाव : नागरिकांच्या प्रती प्रेम, सहानुभूती, सहवेदना आणि एकात्मतेची भावना ठेवून निःस्वार्थपणे कार्य करून लोकाभिमुख सेवा पुरवणे.